निवृत्ती
गळून गेले माझे मी पण
अनुभूतीला सारे अर्पण
रम्य बालपण हरपुन गेले
यौवन सांप्रत नाही उरले
वानप्रस्थ मी या संसारी
नामस्मरणी मंत्र हरिहरि
कशास चिंता वार्धक्याची
निःष्कर्म वाट चिरशांतीची
शैशव जपतो निजप्रौढत्वी
सूर आळवित मनी भैरवी
कोलाहल ना गमे अंतरी
कवित्व मजसि देन ईश्वरी
मीपण नुरता उरते शांती
शांति लाभता सरते भ्रांती
थांबवि श्रीहरि व्यर्थ भ्रमंती
मनुजा लाभे चिर विश्रांती
येतो उघडा जातो उघडा
सवे जाईना वैभव वाडा
मी जाता मग राहिल काय
होइल काही का अंतराय
हेमंत राम पाटील
दहिसर, मुंबई
8108419392.
No comments:
Post a Comment