स्वातंत्र्य (स्पर्धेसाठी कविता )
पंधरा आँगष्ट एकोणीसशे सत्तेचाळीस
हिंदूस्थान माझा झाला स्वतंत्र भारत देश
घटनाकारांनी दिल्या दुर्बला सवलतींस
दुर्बल व्हावे सबल दश वर्षात हा उद्देश
दहा वीस तीस वाढता वाढली वर्ष सत्तर
जातीआधारीत आरक्षण झाले बलवत्तर
जो तो झाला मागासला होण्यास तय्यार
खायला बकासूर आणि भुईला अधिभार
द्यावे कोणा कोठून आणि कसे आरक्षण
पाहून उद्रेक नाहिर्यांचा शासनकर्ते हैराण
बौद्धिक पात्रता ठरतोय मुद्दा आता गौण
जातीवंत व्हा मिळवा नोकरी नि शिक्षण
स्वतंत्रते भारती हेच का ध्येय तुझे होते
गुणवंत गाठी विदेश काय त्यांचे चुकते
आरक्षणे सबल झाले हक्क सोडी ना ते
उद्या घडेल क्रांती होईल होत्याचे नव्हते
...कवी- हेमंत राम पाटील
दहिसर-मुंबई.8108419392.
No comments:
Post a Comment