वटपौर्णिमा
हांगे वड वल्लरिला फांद्या तोडून बोडका केला
सात जल्मपतिव्रता वसा सावित्रीनं सत्ययुगी केला
सजा मात्र मला जल्मठेपी देउन बांदिवान केला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला
योस नवरा पायजे जहा काय सद्गुणाहा पुतळा
क्याला वटपूजा ढोंग जरि जीवा लागती कळा
नवरोबा तळीराम आसाराम सुधाकर लाभला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला
वटवृक्ष शाखा तोडून गृहशांती कैसी लाभेल
धागा गुंडाळून व्यसनाधीन कहाक सुधारेल
एका जल्मात हौस फिटली सात जल्म क्याला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला
दोघांना पुडसा मानव जल्म भरोसा काय धरावा
वेगवेगळ्या योनि आपला तुपला काय निवडावा
मुळात पुनर्जन्म नहेन तर खटाटोप वाया गेला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला
........पी. हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment