गाई पाण्यावर
गाई पाण्यावर बळिराजा आल्या
पोटभर चारा पाणी ना मिळाला
वासुरे उपाशी अन दूध ते तुमाला
रस्त्यावर सांडून चिखल का केला
भाजीपाला फेकून वाया घालविला
माणदेशी भूमी देवतेहा कोप ओढवला
मंत्री संत्री तुमसेस बहुकाळ राज्यकर्ते
कर्जात बुडवून तुमा केले साफ नाकर्ते
जहा काय घोर अन्याय तुमावरस जाले
कर्जमाफी देउन सतत करदात्या नागविले
कोकणी बळीराजानं काय घोडं मारलं
त्यांना बुडताना कवास का नाय तारलं
अरे सरकारा घ्या जकल्या जमिनी ताब्यात
सामुदायिक सरकारी शेती येऊदे लावणीत
हुंडाप्रथा व्यसने यांना कदा दूर करवेनात
जिद्द हरवली यांसी करण्या संकटावरी मात
वीजमाफ कर्जमाफ निवृत्तीवेतन सब्बन हवे
मागण्याला अंत नाही पुरवणारे सरकार द्यावे
.......पी.हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment